Sunday, April 19, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - १०

                                     मुक्तपक्षी भाग क्रमांक -१० 

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






अस्तित्वासाठी खोळंबलेली पंचेंद्रिय 
          हृदयरसाचे पेरीत प्रीतीगान
               याच घरातला तुझा वावर
                  तु नसतांना आठव अनुभवेन ~~~~~~~~~





          प्रत्येक क्षणी धुंद फुंद मी
              ध्यास मी श्वास तु
                  बंध जुळून बेहोश मी
                    न संपणारी साठवण तु .~~~~~~


किती मुश्किलीने सावरलेलं
      चिखल पुसून ओलाव्यात सुखावलेलं
           क्यानवास पूर्वीचा स्वच्छ श्वेत
              सुखाच्या मोहक रंगात रंगलेलं ~~~~~


पापणीआड डोह नी:शब्द्तेचे
 वर्मी बसलेले घाव साखळलेले 
    ओठातले शब्द ही थिजलेले 
       हसू चांदण्यांचे नको असे विखुरलेले~~






   स्वातंत्र्याने उडण्यासाठी 
     अनंत आभाळ पसरले आहे 
        नको पाहू थबकून मागे 
          सोबत निर्मळ हास्य आहे ~~~~~ 





                 राधे __/|\__कृष्ण                      कैलास मांडगे ~~~~~

Thursday, April 16, 2015

प्रीत योगायोगाची ----- लेखिका सौ तारा ठाकरे

~~~~ प्रीत योगायोगाची ~~~~

                                               सौ. तारा ठाकरे   - मुंबई                 
                                  प्रिन्सिपल .... प्रबोधन ठाकरे ...विद्यालय 


          एका सेमिनार च्या निमित्ताने ती दोघ एकमेकांना भेटले खूप जुजबी ओळख झाली ती पत्रकार आणि तो लेखक सेमिनार नंतर दोघे आपापल्या घरी निघून जातात पण निरोप घेताना 
...एकमेकांना पत्ता देऊन जातात, एकमेकांशी सातत्याने पत्रव्यवहार चालू असतो दोघही एकमेकाचे प्रेरणास्थान बनतात पण तिने सांगितलेले असते तू मला भेटायला मी सांगेपर्यंत येणार नाहीस तो हि अट मान्य करतो.
पण विधिलिखित वेगळे असते ..
त्यांची भेट कधीच होणार नसते ....
दुर्दैवाने बातम्या चे वृत्तांकनास जात असताना तिचा अपघात झाला ..

अपघात मोठां होता त्यात ती अपंग झाली... तिच्या मेंदूला ही बरीच दुखापत झालेली होती या जीवघेण्या प्रसंगाने तिची पत्रकारिता थांबते पण तरीही ती त्याला कळवत नाही.
त्याची लेखक म्हणून घौडदौड चालू असते..
दोघांचा पत्रव्यवहार नियमित सुरु असतो आणि या विचारांच्या देवान घेवाणीत ते एकमेकाच्या प्रेमात कधी पडले ते समझले देखील नाही ....

तो तिला त्याच्या कथानकातील मध्यवर्ती नायिका समजून लिखाण करीत असतो. सर्व पुस्तके तिला पाठवतो ती वाचते अभिप्राय दाखल  खूप मार्मिक पत्र पाठवत असे.
अशी त्यांची जगावेगळी कल्पने पलीकडची प्रेमकहाणी असते. परंतु नियती ला हे मान्य नव्हते .... दरम्यान तिची प्रकृती खूप खालावते व उपचारापलीकडे दुखणे जाऊन दुर्दैवाने ती त्याच्या आठवात प्राण सोडते. 
त्याला यातील काहीही माहीत नसते त्यामुळे त्याचे नियमित पत्रव्यवहार करने चालू असते ...
पण पत्राचे हल्ली उत्तर मिळत नाही... 
हे पाहून तो बेचैन होतो ... रागावलीस का

 काही झाले का ? 
तु ठीक आहेस नं ?
असे ही प्रत्येक पत्रात विचारणा करीत असतो ..
काही वेळा आयुष्यात असे काही वळणे येतात की ते नियतीलाचं माहीत असतात ...
 त्या गावात पोष्टऑफिस चा विस्तार वाढतो ... पोस्टमन बदलतो आणि तिच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या ... दुस-या घरी पत्र घेऊन जातो..
योगायोग कसा ... 
ती तिचीच मैत्रीण पण आंधळी असते तिला आश्चर्य वाटते कोणी मला पत्र पाठविले. 
ती आश्चर्य चकित होते .
 पण उत्सुकता म्हणून व शिष्टाचार मोडून ते पत्र ती पोस्टमनला पत्र वाचायला सांगते आणि त्यातले भाव वाचून आपल्या मैत्रिणीच्या आठवणीने तिला गदगदून येते आणि याची जाणीव होते  कि त्याच्या कथानकांची नायिका माझी स्वर्गीय मैत्रीणचं आहे म्हणून ...
ती खूप विचार करते आणि पोस्टमन ला दुस-या दिवशी यायला सांगते ....
यावेळी तीची अवस्था अतिशय चलबिचल असते ..
तिच्या मनात योग्य की अयोग्य ...
काय करावे ? होय ... की नको ? 
पण तिने पुन्हा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून त्याला धीर देण्याचा निर्णय घेतला .
दुसऱ्या दिवशी पोष्टमन यांना विनंती करून ती पत्र लिहायला सांगते आणि जे कधी संपलेच नव्हते असे पुन्हा होऊन पत्र लिहिण्याचा क्रम सुरु होतो.
 पोस्टमन लिहून देत असतो पहाता पहाता ~~~
आठ ते दहा वर्षाचा कालावधी लोटतो~~~
 कालानुरूप तो एक प्रतिभावंत आणि प्रसिद्ध लेखक म्हणून नावारूपाला येतो .
खूप नावलौकिक मिळवतो पण आताशी त्याच्या सहनशीलतेचा बांध सुटतो...
 मी तुला भेटणारच .....
तिची आंधळी मैत्रीण खूप धीराने आणि हिम्मत एकवटून त्याला ..
ये~~~ असे कळवते ...

कैक वर्षानंतर भेटण्याचा क्षण जवळ आलेला हे पाहून तो तिला भेटण्या साठी खूप आतुर होतो ... आणि लगेच पुढील रविवारी तो तिच्या गावी पोहचतो ... त्याची तिच्याशी भेट होते.
तिच्याकडून भुतकाळाच्या सर्व वेदनामय घटना ऐकतो... नियतीने त्याचेशी केलेला खेळ पाहून खूप खिन्न होतो.
तिच्या आठवणीने तो अतिशय कासावीस होतो त्याला भडभडून येते.
त्याची ही अवस्था पाहून तिची मैत्रीण त्याच्याकडे माफी मागते...
मी तुला फसवले तिच्या नावाने पत्र लिहून !!!
पण त्यावेळी तू यशस्वी होण्याचा मार्गावर होता.. आणि तिच्या दुख:न निधना च्या  बातमीने कदाचित तू उन्मळून पडला असता,
यातून सावरला नसता ..
कदाचित दुखी होऊन तुझे लिखाण थांबले असते ..
तुझे वर्तमान अंधारमय होऊ नये ....
हे सर्व लक्षात घेऊन योगायोगाने आलेले पत्र पहाताच त्यात खंड न पडू देता मी सद्सद्विवेक बुद्धीने तिला तु गृहीत धरावे या मानसिकतेने पत्रव्यवहार चालू ठेवला...

मी तुझी दोषी आहे ... मला तु हवी ती शिक्षा दे !!
हे ऐकून तो धीरगंभीर होऊन अवाक झाला .
तिच्या पत्रातील लेखनातील वैचारिक दृष्टीकोन त्याने अनुभवलेले होते .
तिने योग्य प्रसंगी दाखवलेले बौद्धिक चातुर्य ...
पण आता तिला प्रत्येक्ष पाहित्यानंतर ति जग पाहू शकत नाही . तरी ही तिने तिच्या अंधत्वा वर मात करून पोष्टमन यांना वेळचे वेळी मदत करायला भाग पाडले .त्यासाठी तिला प्रत्येक वेळी किती अडीअडचनिंना सामोरे जावे लागले असेल . असे नानाविध विचारचक्र त्याच्या मनात तांडव करीत होते .
पण दुसरी बाजू पाहिली तर जर तिने मला कळवले असते आणि मी त्या दुखात एकटा पडलो असतो ... त्यातून आलेल्या निराशेतून बाहेर पडलो नसतो तर ?
आज मी प्रतिभावंत नसतो .... कारण माझी नायिका चं संपली असती मी काय लिखाण केले असते .... त्यामुळे हीने मला मोठा आधार दिला. माझी प्रतिभा वाया जाऊ दिली नाही ... आता माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे की ही जरी अंध असली तरी आम्हाला दोघांची एकमेकांना गरज आहे .
 आता तूच माझ्या कथांची नायिका...
,माझी सर्वस्वी जबाबदारी आणि प्रेरणा सुद्धा ....
तो तिला घेऊन शहरात त्याच्या घरी येतो व पुन्हा नव्याने लिखाण सुरु करतो.

 एक यशस्वी लेखक होतो तात्पर्य .....

"एखाद्याला यशस्वी होण्यासाठी केलेली एखादी प्रामाणिक चूक सुद्धा कधी कधी उपकारक असते ""!!!!!

                         सौ तारा ठाकरे ```



                                        राधे __/|\__ कृष्ण                                  कैलास मांडगे ............

मुक्तपक्षी भाग क्रमांक - ९

                                                               मुक्तपक्षी भाग क्रमांक - ९ 
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
               अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






संपूर्ण सारं विश्व सुंदर 
     तसं पुन्हा जगायला हवं 
        नातं किती अलवार मोहक 
           ते आता सतत जपायला हवं ~~~~~~~~~~~~~~~





मी शोधला विसावा तुझ्यात 
     याची देही डोळा देखिले 
          नवयुवती आकाश तारांगणी 
               तेजाने मज रोमरोम न्हाईले~~~~~~~~~~



असा कसा देऊ होकार 
      मन सोडते सारखं सुस्कार 
           फुल्रराणी चा बहर फुलवायचा 
             सौभाग्यात मोगरा माळायचा !!!!



नजरेत सारं ओळखीचं 
           तरी गोंधळून का पहायचं 
                मिश्कील सारं गालातल्या गालात 
                    जेथे जावे तेथे बंधनात ...............



येणं जाणं अत्तरासारखं 
     साधेपण निशिगंधा सारखं 
          भेटणं पहिल्या पावसा सारखं 
               मातीचा सुवास गंधाळण्या सारखं ~~~~









                                                           राधे __/|\__कृष्ण                      कैलास मांडगे ~~~~~~~

Tuesday, April 14, 2015

' ती ' ---- प्रा. मनीषा जी जैन - बांदे -- मुंबई ......


                                                              ' ती '
                                                                 प्रा. मनीषा जी जैन - बांदे  
                                                                                                       मुंबई ......


ती
ती तशी साधीच परंतू चारचौघींसारखी मात्र निश्चितच नाही.
उच्चशिक्षित, प्रगल्भ, विचारी, संवेदनशील, हळवी, बाणेदार इ. बरेच काही गुण असलेली...

लग्न होऊन एका सामान्य वकूब असलेल्या त्याच्या गळ्यात पडलेली...
लग्नानंतर लगेच दिवस राहिल्याने करीयरवर पाणी सोडावं लागणारी...
तो दिवस भर कामासाठी बाहेर...
ही दिवसभर घरकाम व मुल यांच्यातच बुडालेली...

ती वाचनाची प्रचंड आवड...
वक्तृत्वात हातखंडा असलेली...
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृतमध्ये तरबेज...
तो धड मराठीही न वाचता येणारा...
घरातच राहून हळूहळू तिच्यातली ठिणगी विझू लागतेय की काय ही तिला भिती...
मित्रमैत्रीणी कुणीही उरलं नाही...
बोलायला समविचारी, समवयस्क कुणीही नाही...
आर्थिक परिस्थिती बेतासबात...
नौकरी करते म्हणाली...
तो नको म्हणाला...
मुलाकडे कोण बघणार?
ते वाया जातील, वाईट संस्कार होतील...
तिला पटले...न पटले...ती घरातच राहिली...
पैसा पुरेनासा झाला...
ती मग घरातल्या घरातच काहीबाही उद्योग करू लागली.
ती घरातल्या घरातच मुलं सांभाळू लागली.
स्वतःच्या मुलाची आई होतीच आता शेजारपाजारच्या मुलांचीही दाई झाली.
त्याने विरोध केला...
पण चार पैसे हाती ठेवताच त्याचा विरोध मावळला...
तिला त्यातच खूप आनंद झाला...
तिच्या अस्तित्वाची जाणिव झाली...
त्याने नंतर तिला बँकेत अकाऊंट उघडून दिले.
ते स्वतःच्या नावाचं एटीएम कार्ड, पासबूक पाहून तीचा आनंद गगनात मावेना.
आता चार गरजा भागू लागल्या. फार नाही पण मिठमिरचीसाठी का होईना तीचा पैसा कामी येऊ लागला.
छान निटनेटकेपणाची आवड असलेली ती इस्त्रीला पैसे लागतात म्हणून ती कधीच स्वतःचे कपडे इस्त्री करत नाही.
तेवढीच बचत....
घालायचे...धुवायचे...नीट घडी करून ठेवून परत घालावयाचे...
तो ट्रेन प्रवास त्रासदायक होतो म्हणून घरात चिडचिड करू लागला...
तिने त्याला जमवलेल्या पैशातून दुचाकी घेऊन दिली.
ती पार्लरवाली खूप पैसे घेतात. ते पैसे घरखर्चाला उपयोगी पडतील म्हणून क्वचितच वर्षातून एखादेवेळीच पार्लरमध्ये जात असे. मी घरातच तर असते. कोण बघतंय मला...अन् आहे तशी मी छान आहे असे म्हणून टाळायची.
पुढे पुढे तो मानेला मुंग्या येतात म्हणून तक्रार करू लागला.
तिला वाटले स्पाँडेलिसीस असला तर?
कसं करावं? लगेच डाॅक्टर कडे घेऊन गेली. डाॅक्टर ने औषधी दिली. बरं वाटलं तात्पूरतं. पण परत तेच...
ती परत म्हणाली, "तूझी नौकरी, तब्येत महत्वाची. पैसे काय चाटायचेत? तूला काही झालं तर मी काय करू ?"
तीने त्याला लगेच चार चाकी घेण्यास पैसे दिले.
तो आता चारचाकीत जातो.
ती तिथेच तशीच घरात...
नाही म्हणायला तो कधीतरी गाडीत बसवून बाजारात घेऊन जातो.
त्याला जरा सर्दी झाली, दात दूखला की तो घर डोक्यावर घेणार...
तिच्याकडून सगळे करून घेणार...
तिला काहीही होत नाही हेच त्याला वाटतं...
झालं जरी काही तरी डाॅक्टरकडे नेलं की त्याचं कर्तव्य संपतं.
तो फारसा बोलत नाही घरी...
तिची बौध्दिक भूक फार...
पण त्याला क्रिकेटपलीकडचे जग माहित नाहीच.
तिला वाटतं कुणाशी तरी चालू घडामोडींवर चर्चा करावी.
पण तो थकून येतो.
घरी आला की जेवतो अन् झोपतो लगेच.
तिला काळा रंग फारच आवडतो.



काळी गाडी घे तर तो नको म्हणाला.
त्याने तांबडी घेतली.
गेल्या कित्येक वर्षांपासून तिला संक्रांतीला काळी चंद्रकला हवी आहे.
पण तो म्हणतो," तू कुठे साड्या नेसतेस?"
दर संक्रांत अशीच काळी चंद्रकला मनीमानसी लेऊन ती स्वप्नातच खुश होते.
काल तो कौतुकाने म्हणाला, "कित्ती हौस असते नं बायकांना.
आमच्या ऑफिसातील सर्व जणी छान काळ्या साड्या घालून येणार आहेत. नटूनथटून येणार आहेत.
धमाल येणार आज. "
कित्ती सहज तो असं बोलला.
तिलाही मन भावना आवड निवड आहे हे तो विसरूनच गेलाय बहुतेक.
ती जिवंत आहे की मेलेली?
ती उभी आहे.

काम करतेय म्हणजेच तिला काहीही झालेले नाही.
ती साधी घरगुती असल्याने तिला गरजा मुळीच नाहीत
हाच त्याचा समज झालाय. ती बोलून दाखवते.
तरीही त्याचे लेखी तिच्या शब्दांना किंमत नाही.
तो शांत बसतो. ऐकतो. कामावर निघून जातो.
ती आपली एवढ्या वर्षात आहे तिथेच आहे...
अगदी तिथेच...

                                          ***मनिषा***



              राधे __/|\__ कृष्ण                                                                               
                                               कैलास मांडगे ~~~~~~