Friday, November 27, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 24



                   आठव किती जपायचे
            वर्तमान हेच मोल नात्यांचे
     प्रेमात परिमल जपायचे
जगरीत सोबत चालायचे ~~~






     


         आठवांच्या अल्हड़ लाटा 
               आलिंगन देताना ज़ेपावतात 
                     तूच तर राधा तुजाच हां कान्हा 
                           आसुसलेले मन भावविभोर हळवेपण ~~~ 






                अलबेली तू सांजबावरी
            सर्वार्थाने  स्व:तस शोधणारी
        सैरभैर उगीच वाटणारी
    क्षणोक्षणी चाहूल  कासाविक होणारी 





झेंडा फड़फड़तो तुज्या भक्तीचा
   अधर्माची लाठी नारी तू नारायणी
           भक्तीने लगाम लागतो दुर्गुणाना
             अम्बे तुज़ा महिमा वर्णावा किती ~~~~~









ईवल्याश्या मनाचा किती पसारा
    पौर्णचन्द्र प्रीतीत धागा नात्यांचा
        मुक्या  भावनांना  नजरेत वाचताना 
            मिटुन पापण्या रोमरोम भिनणारा ~~~



जाणते अजाणतेपणी समोर तीच छबी
    आकाश आभासात साऱ्यांमधे तू
         उगाच सावकाश शिकलो हे सार
           जपून वेदना उरात बाळगतो ~~~~




             जेव्हा रात्र मोहरताना लाजते
           धुंद  कळ्या टपोरतात
      प्रितीचे गहिरे पदर  न्याहाळते
बघ चांदण्या कशा  टिमटिमतात ~~~~





जल्लोष आज मैफिलीचा न्यारा होता
  शब्दा शब्दाना बहर  होता
    हर एक भावना मोती होत  होता  तिच्या प्रेमाचा कैफ मदहोश करीत  होता~~~~~ 




























राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!


                                                         कैलास मांडगे 


..









मुक्तपक्षी भाग क्रमांक - 23

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे








खरी नाती , निस्सीम बंध  मिळतात
       पण कितीतरी पावसाळे जातात
            जुळणारे वेळी अवेळी  सुखभरे
              अव्यक्त क्षण मोहन टाकतात



शब्दांच्या अर्थाचा अनर्थ नको
  किती दिवसात लाभला निवांत
     किती उष्ण पण मोहक हां स्पर्श
       शहारून  उठू दे चांदण्यांवर तरंग ~~~~




रोमांटिक सुचायला प्रेमच
    करायला हवे कशाला
       मैत्रीतही निर्मळ मोहक नात  रुजत
         मैत्रीच्या नात्यात क्षिति मनास होईल का ?





राजस बावरी ग राधा
    अनुराग अजूनही तस्साच ताजा
         जसे कुबेराचे फुलले भांडार
            रोमरोम स्पर्शता  दाटली लाली गालाला ~~~



      मनापासून विश्वासाने प्रेम केलत 
    तर नक्कीच निर्व्याज प्रेम मिळते 
  प्रेमाची शाई असते आई 
बासरीच्या सुरात गुंग होणारी राधाई ~~~ 




राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 




Friday, November 6, 2015

----- एक कातर वेळ ----

----- एक कातर वेळ ----

                                                         लेखिका -- सई (संतोषी साळुंके )


एका प्रेयसीची तिच्या मनातली अशी हि एक कातर वेळ .........

सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ .
दिवे लागणीच्या वेळेस कातरवेळ म्हणण्याची जुनी पद्धत आपल्या कडे आहे .एक अशी वेळेची कातर ज्यात दिवस आणि रात्र एकमेकांना दुभागतात 
आणि त्याचा मध्य गाठणारी वेळ म्हणजेच कातर वेळ .
त्याचा अर्थ आणि अनुभव प्रत्येकाला माहित असतो , पण काहींना कळतो काहींना कळत नाही . कारण माणूस किती हि हुशार विद्वान असला तरी सायंकाळ हि कोणाचीच चुकचुकल्या शिवाय सरत नाही .
एक अशी घटका ज्या घटकेत कोणाची तरी ओढ लागते
,जीव कासावीस होतो , उदास वाटू लागतं किंव्हा क्वचित लाजरस हसू येतं . त्यात पावसाची भर हा उत्तम प्रकार आहे . अशा संध्याकाळी ओल्या हवेत श्वास घेताना अंगावर येणाऱ्या त्या शहाऱ्याची भावना आजवर कोणी स्पष्ट केली नाही ,किंबहुना ती करू हि शकणार नाही . गारवा , हवेतला ओलावा सहज अंगाला स्पर्श करून जातो आणि मनाला थोडा विसावा देऊन जातो . मला खूप आवडते हि पावसातली कातरवेळ .
थंड ओली आणि अंगावर रोमांच फुलवणारी हि कातरवेळ सगळ्यांनाच आवडेल पण ती उपभोगायला तसं मन हवं नं……
प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नसून हा मनातून जोडलेल्या प्रेमाचा अनुभव सुधा असु शकतो . ज्याला हा अनुभव घेता आला त्याला प्रेम समजलं आणि प्रेम समजल म्हणजे जगणं हे आलच . हे असे छोटे छोटे आनंद माणसाने अनुभवावे कारण यातूनच नातं घडत जातं फुलत जातं .
निसर्ग हा उत्तम प्रकार आहे स्पर्श समजण्याचा . अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या कडून आपण शिकू शकतो ,समजू शकतो ,अनुभवू शकतो . त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे फक्त ते अनुभवणार मन हवं .विचार करता करता माझ लक्ष त्या संध्याकाळच्या दिव्याकडे वेढल होत .
तो सुबक शांत लखं चमकत होता . त्याची ती स्थिरावलेली जोत सर्वत्र कोवळा प्रकाश पसरवत होती आणि मन प्रसंन करत होती . बाहेर बऱ्यापैकी गारवा होता . मी ओट्यावर बसून काहीतरी विचार करत होते . दिव्याच्या बाजूने अगदी सरळ काळी रांग पुसटशी दिसली . मी ते काय आहे पाहण्या साठी जवळ गेले तर काळ्या मुंग्या अगदी तालात सरळ दिशेने पुढे पुढे जात होत्या .
त्या प्रकाशात सरळ जात तर होत्याच पण अंधारात हि रस्ता न भरकटत चालत होत्या . कुठे तरी पुस्तकात वाचलं होत . मुंगी चालताना तिच्या शरीरातून एक प्रकारच द्रव सोडते ज्याला फेरोमोन असे म्हणतात . त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क कारण सहज सोप होत . तसेच आपल्या मागचे साथीदार रस्ता भरकटू नयेत आणि आपल्या सोबतच राहावेत हि भावनाही तितकीच तीव्र असते .
तितक्यात एक मुंगी इकडे तिकडे भरकटलेली मला जाणवली . पाहिल तर ती पाण्याच्या थेंबा जवळून गेली होती म्हणून रस्ता भरकटली . कारण ते फेरोमोन पाण्याने विरघळल होत . ती घाबरून सैरबैर पळत होती . मी हळूच हात पुढे केला तर ती माझ्या हातावर चढली आणि मी तिला त्या रांगे जवळ सोडल .

तर ……………. तर ती मिसळली त्या रांगेत जणू कधी ती दुरावलीच नव्हती अचानक त्यांचा एक भाग झाली होती ...
माणसाच हि असच काही होत असेल का .………?
तोही कोणा न कोणा च्या मनात आठवण नावाच फेरोमोन पेरत असेलच न………?
ती व्यक्ती रस्ता भरकटू नये आपल्या सोबतच राहावी अशी माणसाची हि तीव्र भावना असून हि ती व्यक्ती का टिकत नाही .…………….? 
ती दुरावलेली व्यक्ती परत अशी आपल्यात मिसळत असेल का ………….?
तितक्याच सहज आपल्या आयुष्याचा भाग होत असेल का .…………?
ती व्यक्ती पहिल्यांदा जेंव्हा भेटेल तेंव्हा कशी वागत असेल .………….?
मी बेचेन होऊन माझ्या खोलीत जाऊन कपाटातील एक बरेच दिवस बंद असलेला डबा उघडला .
त्यात होत माज गुपित खूप वर्ष जीवाशी साठवून ठेवलेलं जपून ठेवलेलं .ते विरघळलेल पिंपळ पान आणि एक दगड ज्याला कोरीव काम करून हृदयाचा आकार दिला होता . त्यात होते काही मोती धाग्यात पिरून त्याने माझ्या गळ्यात बांधलेले .
आणि माझे डोळे पाणावले त्याचा आठवणीने . मी तुटून निराश होऊन एकटीच पुटपुटले 
कुठे दुरावलास तू ……………? 
वाट पाहते मी तुझी .……!
खूप…………….. खूप आठवण येते रे तुझी आज .……… ! 
आणि मी कोसळले खाली …………. सगळ अस्ता व्यस्त पसरलं . बरेच वर्ष ठेऊन धागा कच्चा झाला होता आमच्या नात्या सारखा आणि त्यातले ते मोती खोली भर झाले होते विखुरले होते अगदी माझ्या मनासारखे . माझे अश्रूही आता न थांबता वाहू लागले . मी कासावीस होऊन खचून रडू लागले . कशी होईल भेट आपली ……!
का दुरावलास इतका माझ्या पासून तू …….? 
मला हवा आहेस तू शेवट पर्यंत …………?
शाळा सुटल्यावर आम्ही त्या तळया काठच्या झाडा जवळ भेटायचो .एकदा त्याने माझ्या साठी काही मोती आणले होते स्वत ओउन माळ करून . त्याच तळया काठी माझ्या गळ्यात घातले होते . आठवण म्हणून दिलं होत पिंपळ पान .
आणि तळ्यात भेटलेला दगड झिजून दिलं होत मला एक रेखीव हृदय . खूप आवडायचं मला त्याच अस असण . माझ्यासाठी सतत काही तरी नवीन कारण . आम्ही खूप गप्पा मारायचो .तासान तास एकमेकात रमायचो . खूप प्रेम होत आमच एकमेकांवर. मला आज हि आठवत तो दिवस .
आम्ही सगळे सजून १० वीच्या निरोप समारंभासाठी आलो . थोड बोलणं झाल मन शांत झाल . वेळ झाली ती खरच निरोप घ्यायची आणि मला तिथून निघावासच वाटेना ..

आज आम्ही काही बोलोच नाही आमच्या डोळ्यातून फक्त पाणी ओघळत होत .
मला आता तुला भेटता नाही येणार ………. मी मी बाहेर चालोय शिक्षणा साठी .……!
पण ……… मी हे एकूण संपले होते . पण त्याने मला दिलासा दिला होता . कि तो परत येईल .

शुभंभवतु ......