Monday, March 14, 2016

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 3५

                      अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.



दुखावले प्रेमाने कितीही तरी
    त्याच्या भावनांना पेलायचे असते
       प्रत्येक वेळी त्याचं तेज वाढतच रहाते
          कारण कुठलीही अपेक्षा नसते ~~~~
 एकदा तरी प्रेमात मिसळावं
      समाज नियमांना उल्लंघावं
         जाणीवांना मनात ठेवून धावणारं
               प्राजक्ताच्या मधुगंधात दरवळावं ~~~



सतत स्वप्न बघावे असेच ना
    कधी उन्हाळा तर कधी हिवाळा
         जाणवते कधी झरणारी सारंगधारा
             आनंद देते तेव्हा जगण्या पलीकडचा ~~~




गाढ मिठी एकरूप अशी
   रात्र फुलली चंद्र प्रकाशी
       धुंद मोगरा  अन रातराणी
          मोकळ्या आकाशी काही क्षण अनुभवली ~~~


सितारों का जानता हुं सदियोंसे 
   जहां भी जावू साथ साथ रखते है 
     नीली फिजाये के हसते नूर हमारे 
        आपके हर आंचल से छान जायेंगे ~~~



!! श्री स्वामी समर्थ !!             राधे __/|\__कृष्ण         कैलास मांडगे ~~~

जागतिक मराठी राज्यभाषा दिन ... पण फक्त आज ... उद्या ..... कि चिरंतन ...

               जागतिक मराठी राज्यभाषा दिन ... पण फक्त आज ... उद्या ..... कि चिरंतन ...

आपण सर्वच स्वभाषाप्रेमी सतत आपल्या मायबोली आईच्या समृद्धीची, श्रीमंतीची स्वप्ने पहात असतो. अशी स्वप्नेच आपल्याला आपल्या त्या संबंधातील कर्तव्याची वेळोवेळी आठवण करून देत असतात. त्या आपल्या समाईक ध्येयप्राप्तीसाठी आपण सर्वच सतत यथाशक्ती प्रयत्न करीत राहू व इतरांच्या अशा प्रयत्नांना हातभार लावू.
मुळातच मराठीची, मराठी शाळांची सध्या जी परवड आणि उपेक्षा चालू आहे, त्याची दखल ना सरकारदरबारी घेतली जाणार आहे, ना मराठीच्या उद्‌घोषातून सत्ता आणि संपत्ती संपादन करणाऱ्या "जनतेच्या नेत्यांकडून. 
स्वातंत्र्यपूर्व काळात ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी डॉ. माधव ज्युलिअन यांनी मराठीच्या उपेक्षेचे मार्मिक वर्णन करताना आणि पंचखंडात स्वसत्ता बळाने मान्यता पावलेल्या इंग्रजीचे माहात्म्य मान्य करतानाही "मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजीअसे म्हटले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी शाळांची संख्या कधी सेमी इंग्रजीच्या नावाने; तर कधी मराठी पालकांच्या जोरदार मागणीनुसार सतत लयाला जात आहे. 
रोम मधील व्हेटीकन म्युझियम मध्ये एक स्कूल ऑफ अथेन्सनावाचं जगभरात प्रसिद्ध पावलेलं मध्ययुगीन चित्र आहे. चित्रकाराची कल्पकता अशी की त्याने प्राचीन
ग्रीस मधील वेगवेगळ्या कालखंडातील उत्तुंग व्यक्तिमत्वे एकत्र चितारली आहेत
त्यात अरीस्टोटल, प्लेटो सारखे तत्वज्ञ आहेत, आर्किमिडीज आदी गणितज्ञ आहेत आणि अलेक्झांडर सारखा जगज्जेता देखील!
पण मित्रानो असंच एखादं महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर काढलेलं चित्र बघायला खूप आवडेल. रायगड किंवा राजगडाच्या पार्श्वभूमीवर जमलेला मराठी जनांचा मेळा! त्यात हिऱ्याच्या लखलखत्या रत्नहारासारखी पल्लेदार संवाद लिहिणारे राम गणेश गडकरी असतील, तर शेजारीच त्याच लखलखत्या हिर्याचे धगधगते तोफगोळे कसे बनतात हे दाखवणारे प्र. के. अत्रे असतील. ध्येयासाठी हसतमुखाने फासावर चढणारे चाफेकर , राजगुरू असतील आणि तत्वासाठी गोळी खाणारे दाभोलकर, पानसरे देखील. 
एकीकडे ज्ञानेश्वर माउली लोकमान्य टिळकांना आणि विनोबांना घेऊन गीतेवर भाष्य करत असेल, तर दुसरीकडे तोच कर्मयोग आयुष्यभर जगणारे महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबा आमटे ते भाष्य भक्तिभावाने ऐकत असतील. बालगंधर्वांच्या समवेत भीमसेन असतील, सावरकरांसोबत आगरकर असतील, पु लं च्या बरोबर जी ए असतील, दादासाहेब फाळके असतील आणि त्यांच्याच नावाचा पुरस्कार जिंकणारे भालजी असतील,
अख्खं मंगेशकर कुटुंब असेल…. आणि हा सगळा मेळविलेला मराठाबघून हर्षभरित होणारे समर्थ रामदास पण असतील! कुण्याही सहृदय माणसाने गहिवरून जावं असं हे कल्पनाचित्र…. 
एवढ्या उत्तुंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीमान्त्वांच्या सावलीत आपण लहानाचे मोठे झालो, कळत नकळत त्यांच्या कर्तुत्वांचे संस्कार आपल्यावर घडत गेले या भावनेनं कृतार्थ होऊन जाण्याचा क्षण! म्हणून लेखकांना व सर्वांना च आजतागायत मराठी असल्याबद्दल अभिमान वाटण्यापेक्षा धन्यता वाटत आली आहे!
मराठी असण्याची खरी किंमत समजायची असेल तर माणसाने प्रथम महाराष्ट्राबाहेर पडावं! याचा अर्थ असा नाही की बाहेर सर्वत्र दलदल आहे आणि महाराष्ट्रच काय तो एक हिऱ्या-मोत्यांनी भरलेला आहे. पण बाहेरच्या जगाविषयी आपल्या बऱ्याचदा भुरळ पडणाऱ्या, फसव्या, मायावी कल्पना झालेल्या असतात. पर्यायाने आपण आपल्याजवळ जे आहे त्याला कमी लेखू लागतो, त्याची उपेक्षा करू लागतो. एकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला म्हणजे मग आपले भ्रम दूर होतात. ज्या गोष्टींच्या शोधात आपण इथवर आलो, त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याजवळ
मुळातच होत्या हे समजत
फक्त त्या अघोषित होत्या इतकंच. आणि आपल्या कामाची घोषणाबाजी न करणे हा मराठी नेमस्तपणाचा भाग आहे (राजकीय पक्ष सोडून). मग कानठळ्या बसवणाऱ्या जाहिरातबाजीच्या जमान्यात, चोहोबाजूने जगभरातील विक्रेते अंगावर येत असताना, सामान्य मराठी माणूस या नव्या जगाच्या रेट्यात थोडं बावरून गेला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारख काही नाही! मग तो स्वतःच्या बाजूने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतोमराठीत वाक्यात बळेबळेच इंग्रजी शब्द कोंबतो, बिन तिखट-मसाल्याचा पिझ्झा कोक बरोबर गळ्याखाली ढकलतो, मोठ्या हॉटेल मध्ये गेला कि उगीचच वेटर शी हिंदीत मध्ये बोलतो ( वास्तविक वेटर पण मराठीच असतो पण दोघे झक मारत हिंदीत बोलतात). आणि मग याचीच दुसरी बाजू आपलं दुखरेपण घेऊन समोर येते – “मराठी भाषा जगवायला हवी…”, “मराठी भाषेचा अभिमान बाळगा…”, “… आपल्याच घरी हाल सोसते मराठीइ. इ. सारखे संदेश मग मोबाईल मधून दशदिशांना चौखूर उधळतात.
वास्तविक ना मराठी
असल्या हलक्यासलक्या गोष्टीनी संपणार आहे
, ना कुणाला तीच महत्व मुद्दामहून पटवून देण्याची गरज आहे. भाषेच्या आणि समाजाच्या वाटेत जे चढउतार चालू असतात त्यातलाच हा एक तात्पुरता टप्पा आहे. ज्या प्रमाणे निखाऱ्यावर तात्पुरती राख जमते, तशी ही जाहिरातबाजीची, घोषणाबाजीची तात्पुरती काजळी आहे. पण आतमध्ये मराठीपणाचा वन्ही तसाच आहे, कधी सुप्त तर कधी प्रकट!
मराठीपण दिखाव्यापेक्षा दर्जाला जास्ती महत्व देते म्हणून मराठी चित्रपटांचा नायक हा बॉलीवूड च्या खान मंडळीसारखा फार काही macho वगैरे असण्याची गरज नसते, पण त्याला अभिनय आला नाही तर मात्र प्रेक्षक अर्ध्यातून उठून जातील (बॉलीवूड चं गणित बरोबर उलट आहे). आपल्याकडे हिरोइतका किंवा किंबहुना त्याच्या पेक्षा जास्ती दबदबा हा निळू फुले, श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, डॉ मोहन आगाशे आदी नटश्रेष्ठांचा राहिला आहे. आणि महाराष्ट्राने सिनेमापेक्षाही थोडं अधिक प्रेम नाटकावर केलं आहे.
मराठीपण गाण्यांच्या चाली इतकंच गाण्याच्या आशयाला महत्व देते म्हणून आपल्याकडे भावगीतगायनासारखा प्रकार एवढा रुजलागाण्यांच्या चाली जेवढ्या महत्वाच्या, तेवढेच गाण्याचे बोल महत्वाचे. ग. दि. माडगुळकर, इंदिरा संत, शांता शेळके, वसंत बापट, ना. धो. महानोर यांच्या सारखे प्रतिभावंत आपल्याला गीतकार म्हणून लाभले. अगदी दादा कोंडकेंनी
लिहिलेली गीते देखील द्वयर्थी आहेत
, पण अर्थशून्य नाहीत. मराठीतील चित्रपटगीते जेवढी आशयगर्भ असतात तेवढी बॉलीवूड ची सहसा नसतात, आणि इंग्रजी पॉप मध्ये तर अजून वाईट परिस्थिती आहे.
मराठीपण म्हणजे सामाजिक बांधिलकी या सामाजिक बांधिलकी मुळे महाराष्ट्रात तळागाळात काम करणाऱ्या व्रतस्थ सुधारकांची/समाजसेवकांची जगाला हेवा वाटावी अशी परंपरा निर्माण झाली आहे. पूर्वी च्या काळी हि ज्ञानेश्वर-तुकाराम आदी संतांची परंपरा होती, जी पुढे विनोबा भावे, गाडगेबाबा, बहिणाबाई, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांनी समाजसुधारणेच्या माध्यमातून पुढे नेली. हे सगळे NGO वगैरे प्रकार सुरु व्हायच्या कित्येक आधीपासून! आणि आज त्याच परंपरेतून अण्णा हजारे, डॉ विकास आमटे, कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकसेवक पुढे आले.
मराठी माणूस जन्मजात वाचक असतो. जसं बंगाली कुटुंबामध्ये हमखास हार्मोनियम सापडते, तशी मराठी कुटुंबांमध्ये थोडी फार
का होईनात पण पुस्तके मिळणारच
मग ती स्वत:ची असोत किंवा इतर कुणाची! शिवाय रोजच वर्तमानपत्र आहेच. वाचन मग ते अति गंभीर तत्त्वज्ञांनाविषयी असो किंवा निखळ विनोदी पण ते वाचकाला एक वैचारिक बैठक देते. भारतातील काही प्रांतामधील लोकांना चहाचे कप समोर ठेवून कुठल्यातरी राजकीय/तात्विक मुद्यावर चर्चा करण्याचे व्यसन आहे यांत महाराष्ट्र अग्रभागी. ही चर्चा दिवाणखाना, दवाखाना, केशकर्तनालय, तरुण मंडळाचा कट्टा अशी कुठे ही होऊ शकते. पण ही अशी होणारी चर्चा आणि अवांतर वेळेत चालणारे वाचन यांचा परस्परसंबंध आहे. आणि या सगळ्याचे पर्यवसान हे सामाजिक बांधिलकी मध्ये होते. म्हणून महाराष्ट्रातील सण-उत्सवांचे स्वरूप अधिक सामाजिक स्वरूपाचे आहे. शिव-जयंती, गणेशोत्सव, दही-हंडी हे सगळे आहेतच, पण आपण दसरा किंवा संक्रांत पण घरी बसून साजरी करत नाही चार घरे फिरून सोने/तिळगुळ देऊन येतो , या शिवाय हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, मंगळागौर इत्यादी आहेतच. म्हणूनच एक समाज म्हणून , मराठी समाजाची वीण मला इतरांपेक्षा अधिक घट्ट वाटते. पण मी मघाशी म्हणल्याप्रमाणे, अशा गोष्टी जाणवण्यासाठी काही वर्षे तरी महाराष्ट्राबाहेर राहिलं पाहिजे.
मराठीपण म्हणजे साहित्य साहित्याचे सर्व चषक इथे काठोकाठ भरलेले आहेत मग तो कथा, कविता, कादंबर्या, नाटके, ललित , साहसकथा, प्रवासवर्णन काहीही असो.
यात पु लं सारखे आनंदयात्री आहेत आणि जी ए सारखे गुढयात्र देखील. केशवसुत
, बालकवी, कुसुमाग्रज यांच्यापासून चंद्रकांत गोखले, संदीप खरे पर्यंत समृद्ध काव्यदालन आहे. खांडेकर, माडखोलकर, नेमाडे सारखे तत्वचिंतक आहेत. रणजीत देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्या सारखे ऐतिहासिक-पौराणिक कादंबरीकार आहेत. ही न संपणारी यादी आहे…. मराठी भाषेत सध्या ४ ज्ञानपीठ विजेते आहेत (शिवाय १ कोकणी मध्ये) हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम च्या पाठोपाठ. कदाचित हि संख्या वाढली पण असती, मात्र पूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार हा विशीष्ट साहित्यकृती ला दिला जात असे, साहित्यिकाच्या सर्वकष कामाला नव्हे. आता हा नियम बदलला आहे. जर पूर्वी पासून असा नियम असता तर कदाचित पु लं, वं पु, जी ए, कुरुंदकर या सारखे कुणी ज्ञानपीठ च्या पंक्तीत दिसले असते.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिनम्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिनम्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताहम्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या
दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय?
मराठीपण म्हणजे हे सगळं असण आणि यापेक्षा बरंच काही असणते किल्यांची पदभ्रमंती करण्यात आहे, पंढरीची वारी करण्यात आहे, शिवजयंतीला शिवज्योत घेऊन दौडत जाण्यात आहे आणि नवीन वर्षाच्या पहाटे अक्कलकोट ला जाऊन केलेल्या श्री स्वामी समर्थ च्या गजरात आहे. हे मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही. हे मराठीपण फ़क़्त मराठी बोलण्यापुरते नाही आहे, उलट मराठी भाषा हे ते मराठीपण व्यक्त करण्याचं साधन आहे. म्हणून जोपर्यंत मराठीपण आहे, तोपर्यंत मराठी भाषा राहणारच!
पण झाला माझ्या .... तुमच्या ... सर्वांच्या माय मराठी चा उदो उदो केला .... फक्त आजच्या च दिवशी ..
नाही नाही ..........मित्रानो .... भगिनीनो .......... खूप विचार करा ....




.... राजभाषेचा दर्जा प्राप्त करून द्यायची म्हणजे 

                               फक्त दिन साजरे करून भागत नाही . 
फक्त त्याच दिवसा पुरते त्याचं महत्व ... प्रेम ...... कळकळ न दाखवता               आपण सर्वांनीच ही कास कायम धरूया 
                           आणि सतत हाच ध्यास धरूया ..... 

लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी .........
                 आमच्या मनामनात ..... तनातनात ....
                                           रगारगात .... नांदते मराठी ............





..... संदर्भ ..... गुगल बाबा .....
.......राधे __/|\__ कृष्ण

 कैलास मांडगे ~~~~

Sunday, March 13, 2016

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 34

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.




भावना  फुलतात क्षणात डोळ्यात
    मखमली शब्दांचा स्पर्श ओठांवर
         लटकेच रुसणं गात्र शहारतात
               चैत्रात गुलमोहराला आलाय मोहोर ~~~





जपून ठेवला सुगंध रातराणीचा
     शिकलो सारे मोहक क्षणातून
          ओलावा ठेवू नात्यात निळाईचा
               भावनांचे पीळ नको नात्यात ~~~~





प्रत्येक क्षणी धुंद फुंद मी
       ध्यास मी  श्वास मी
            बंध जुळून बेहोश मी
                   न संपणारी  साठवण तू ~~~~~~~~~~


मन कसे फुलपाखरू झाले
    मौनात जशी सजा  असते
           तूच एक निर्विवाद सत्य
                बाकी   सारं व्यर्थ ~~~


प्रत्येक श्वासात चाहूल 
   भावनांना कसं उधळून देवू 
     रोजचं स्वप्नात काहूर 
        क्षणभंगुर जीवनाशी नको खेळू ~~~~


श्री स्वामी समर्थ                 राधे __/|\__ कृष्ण           कैलास मांडगे ~~~

Saturday, March 12, 2016

महिला दिन विशेष -- सकाळ साप्ताहिक


आयुष्याच्या उत्तरार्धात विभक्त व्हायचा निर्णय घेणारी महिला सुखासुखी हा निर्णय घेत नसते. त्यामागे तिची अनेक वर्षांची घुसमट असते. नात्यामधील गोडवा संपला की घुसमट होते आणि ती वाढली की नाती संपतात, देखाव्यासाठी ती टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. का होतं असं? काय पथ्य पाळायला हवीत? नाती सशक्त आणि निकोप राहण्यासाठी गरज असते ती दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची.... 



""विमलताई, तुमचं वय आता 62 वर्षे आणि तुमच्या पतीचे 68. सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण केल्यात. दोन्ही मुलींची लग्नं झाली, मुलाचंही लग्न झालं, त्यांचा संसारही मार्गी लागला. त्यांना त्यांच्या मनासारखं करियरही मिळालं. आता तुम्हाला नव्याने काही करण्याची गरजही नाही. मग आता या वयात घटस्फोट घेण्याची भाषा तुम्ही का करताय?'' 
""
अहो, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीच तर मी इतके दिवस हे पती-पत्नीचं नातं टिकवलं. आयुष्यभर मी नवऱ्याच्या मर्जीनेच वागत आले. सतत संशय... कोणाशी कधी मोकळेपणाने बोलता आलं नाही की कधी कुठे जाता आलं नाही. साधं भाजी आणायलासुद्धा मी एकटी जात नसे. माझ्याबरोबर कुणाला तरी घेऊन जावं लागायचं. माझ्या हातात कधीही पैसा नसायचा. मोजके पैसे मिळायचे आणि सामान किंवा कोणत्याही वस्तू आणल्या तरी त्याचा पै न पैचा हिशेब द्यावा लागायचा. घरात माझ्या कोणत्याही गोष्टीचं कधीही कौतुक झालं नाही. रांधा वाढा आणि उष्टी काढा याशिवाय दुसरं जग नव्हतं. माझी पदवी तर मला गुंडाळूनच ठेवावी लागली. माझ्याच घरात मला ना सत्ता, ना पैसा आणि ना मान तरीही सहन करत राहिले ते फक्‍त मुलांसाठी. आता मुलं मार्गाला लागली, जबाबदाऱ्या संपल्या; परंतु माझा त्रास संपलेला नाही. अजूनही
मला अहंकारी, एककल्ली आणि उद्धट नवऱ्याला तोंड द्यावे लागते. या वयातही मला त्यांच्या संशयी स्वभावाला सामोरं जावं लागतं; परंतु आता ठरवलंय, स्वत:साठी जगायचं. ज्या गोष्टी आयुष्यात करण्याच्या राहिल्या असतील. त्या सर्व करायच्या, मोकळेपणानं श्‍वास घ्यायचाय आणि म्हणून मला या लग्नातून सुटका हवी आहे.'' 
""
विमलताई; पण आतापर्यंत तुम्ही या गोष्टींवर आवाज का उठवला नव्हता? तुम्हाला नक्‍की काय हवं आहे, हे त्यांना का सांगितलं नाहीत?'' 
""
काय सांगणार? ऐकून घेणारं कोणी असेल, तर काही सांगण्यात अर्थ आहे. माझं मत मांडण्याचा नुसता प्रयत्न केला तरी थेट घटस्फोटाची धमकी मिळायची.'' दोन वेळच खायला- प्यायला मिळतंय ना तुला? तेवढीच तुमची लायकी आहे. घर सांभाळा... तेवढं जमलं तरी पुष्कळ आहे. बाहेर पाऊल टाकण्याची भाषा करू नका,'' असे अनेकदा ऐकायला मिळालं. निमुटपणे मी सहन करीत राहिले. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाही, तीन मुलं पदरात, आई-वडिलांना त्रास देऊन त्यांच्याकडे जाऊन राहण्यात अर्थ नव्हता. "लोक काय म्हणतील?' घटस्फोटाचा शिक्‍का कपाळी बसला, तर समाजात अप्रतिष्ठा होईल.'' या भीतीपोटी सर्व सहन करीत राहिले; पण आता नवऱ्याच्या धमक्‍यांना मी जुमानणार नाही. आता मीच त्यांना घटस्फोट देऊन निवांत वृद्धाश्रमात जाऊन राहीन. समवयस्कांसोबत राहता येईल. इतके दिवस सर्व सहन करीत राहिले; पण आता नवऱ्याच्या धमक्‍यांना मी जुमानणार नाही.'' 

""
तुम्हाला खरं सांगू का, हा निर्णय मी घ्यावा असं मुलं मला गेली अनेक वर्षे सांगत आहेत. वडिलांच्या विचित्र स्वभावाची त्यांना कल्पना आहे. तू का सहन करतेस, असे मुलं मला नेहमी म्हणायची. वयात आल्यानंतर कमवायला लागल्यानंतर तर मुलांनी अनेक वेळा मी स्वतंत्र व्हावं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं सांगितलं होतं; पण तरीही लोकनिंदेचा विषय होऊ नये म्हणून माझ्या व्यथा मी कुणाला सांगत बसले नाही. लग्न टिकवण्याचा नव्हे, तर रेटण्याचा प्रयत्न केला; पण आता नाही. माझ्या मुलांना मी सांगितलं आहे. मुलगा परदेशात असतो, त्याने तर मला त्याच्याकडेच बोलावले आहे; पण मी कुठंही जाणार नाही. स्वतंत्रपणे एकटी जगणार, अगदीच हात-पाय चालले नाहीत, तर मग पुढचे पुढे बघता येईल.'' 
""
एवढे वर्षे तुम्ही सहन करीत राहिलात मग आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेणं योग्य होईल, असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या नवऱ्याशी बोलून त्यांनी तर स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची तयारी दाखवली, तर तुमचा घटस्फोटाचा विचार तुम्ही मागे घ्याल का?'' 
""
ताई... अहो सुंभ जळला ना तरी पीळ जळत नाही. तसा माझ्या नवऱ्याचा स्वभाव कधीही बदलणार नाही. त्याच्यात बदल होणं अशक्‍यच आहे आणि तुम्ही म्हणताय तसं एवढी वर्षे मी सहन केलं; पण आता सहन होत नाही. माझ्या सहनशक्‍तीची मर्यादा संपली आहे म्हणूनच मला आता स्वतंत्र व्हायचंय आणि आयुष्यात उरलेले दिवस शांतपणे घालवायचे आहेत.''
 

सततचे अपमान सोसून दुखावलेल्या विमलताई त्यांची व्यथा सांगत होत्या. पुरुषी अहंकाराचं वर्चस्व त्या आयुष्यभर सहन करीत आल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना लग्न बंधनातून या वयात मुक्‍त व्हायचं होतं. विमलताईंसारखी अनेक उदाहरणं समाजात आहेत. असफल लग्नातील घुसमट सोसणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात दिसून येतात. अशी कितीतरी लग्न आहेत, की ज्या लग्नामुळे सुरवातीचे काही दिवस चांगले गेले तरी नंतर एकमेकांच्या स्वभावामुळे अखंड मनस्तापाशिवाय दुसरं काहीही हाती लागलेलं नाही. एकमेकांना टोचत, बोचत, रक्‍तबंबाळ होतं... नातं टिकवतायंत. नव्हे तर संसार रेटातायंत. 
चार भिंतींच्या आत एकत्र राहतात... मुलं-बाळं आहेत. समाजाला दिसायला सर्व काही चांगलं दिसत असलं तरीही दोघांच्याही नात्यात प्रेम... ओलावा... आपुलकी काहीच नाही. आतून ही नाती पोखरलेली असतात. अशा एकत्र राहण्याला काही अर्थच नसतो. एकत्र राहूनही एकमेकांपासून ही नाती खूप दुरावलेली असतात. या घुसमटलेल्या नात्यात मग वाद-प्रतिवाद, एकमेकांविरुद्ध डावपेच चालूच राहतात. घटस्फोटाचा कलंक नको म्हणून समाज काय म्हणेल, अप्रतिष्ठा होईल. या भयापोटी मोडलेली नाती टिकवून ठेवण्याची धडपड चालू राहते; परंतु यातून होणारी घुसमटच अतिशय त्रासदायक असते. स्वत:ला सुख नाही आणि दुसऱ्यालाही नाही. यातून नैराश्‍याला बळी पडणे, व्यसनाच्या आहारी जाणे, घराबाहेर... संस्काराच्या बाहेर आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सुख शोधण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस तात्पुरते सुख मिळतेही; परंतु त्याचे परिणाम फारच वाईट असतात. त्या सापळ्यात अडकलेल्या व्यक्‍ती लवकर बाहेर येणं अवघडच असते आणि मग त्यातूनही मनस्ताप आणि पश्‍चात्ताप... नक्की सुख कशात आहे, हेच समजत नाही. 
संसार करायचा आहे... नाती टिकवायची आहेत, तर मग रडतखडत का? आयुष्यात पुढे
जाण्यासाठी जे पर्याय समोर ठेवले आहेत
. त्यामध्ये त्यातल्या त्यात चांगलं काय, याचाच प्रत्येक जण विचार करीत असतो. मग लग्न टिकवायचं आहे. जोडीदाराचा स्वभाव पटत नाही. तरीही नाती तोडायची नाहीत, तर एकमेकांना समजावून घ्यायला शिकलं पाहिजे. एखादं रोपटं लावलं, तर ते वाढण्यासाठी त्याला वेळच्या वेळी खत-पाणी घालावं लागतं. त्याच्या सोबत वाढणारे तण काढून टाकावे लागतात. वारंवार माती मोकळी करावी लागते. त्याला योग्य ऊन-पाणी मिळेल, याचा विचार करावा लागतो, तरच ते रोप छान वाढू लागते. त्याला कीड लागायला लागली, तर जंतुनाशकांचा फवाराही करावा लागतो, तसंच एकदा संसाराचं रोपटं लावलं, की ते फुलवण्यासाठी त्यातील नात्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. द्वेष, अहंकार, अनावश्‍यक स्पर्धा अशी कीड त्वरित काढून टाकणे आवश्‍यक असते. 
लग्न टिकवायचं आहे, परस्परांतील नाती जपायची आहेत, तर मग आपल्या जोडीदाराच्या स्वभावाचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. त्याला कोणत्या गोष्टींची आवड आहे, कोणत्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, कुठल्या बाबतीत अतिरेक आहे, कोणत्या गोष्टी अजिबात जमत नाहीत, हे काही दिवसांत समजायला लागते आणि मग आपला स्वभाव आणि आपल्या आवडी-निवडी जोडीदारापेक्षा कशा भिन्न आहेत, हे लक्षात येतं आणि मग
पावला
-पावलांवर करावी लागते ती तडजोड. काही तडजोडी छोट्या आणि किरकोळ असतात, काही अतिशय अवघड, कस लावणाऱ्या असतात. या तडजोडी करीत असतानाच अनेक अनुभव येत राहतात आणि या अनुभवातूनच आपोआप शहाणपण येत राहत. आपल्या जोडीदाराची कोणती समीकरण कशी सोडवायची, याची तंत्र हळूहळू गवसत जातात. दोघांच्याही स्वभावातील भिन्नता लक्षात आल्यानंतर चिडून, रागावून, चरफडत जगण्यापेक्षा या भिन्नतेचा स्वीकार करून परस्परांच्या सहवासातून, अनुभवातून सोयी-सवयीने जुळवून जमवून घेत. परस्परांना आनंद कसा देता येईल. याचा विचार करायला हवा. जे आहे ते मान्य करून आपला मार्ग आपणच ठरवायला हवा. 
पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातील खाचाखोचा समजल्यानंतर प्रसंगानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. उच्चशिक्षित, हुशार पत्नी हवी असते. मग तिच्या करियरच्या आड येऊन चालणार नाह. तिलाही पुढे जाण्यासाठी मदत करायला हवी. संधी द्यायला हवी. तिला स्वत:चे करियर प्रिय असले तरी कुटुंब सांभाळताना कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यायचे, आपल्या आवडीला कुठं मुरड घालायची, हे तिनंही ठरवावं लागतं. कोणत्या विषयात कुणी कुणाचं ऐकायचं आणि कोणत्या बाबतीत कुणी कुणाला प्राधान्य द्यायचं हे समजुतीने ठरवायला लागतं. बदलत्या जीवनशैलीत नातेसंबंध सांभाळताना बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. कुणी कुणावर रूबाब गाजवून चालणार नाही. आपल्याला मान्य असो वा नसो; परंतु दोघांनीही एकमेकांना
समानतेनं वागवणे अपेक्षित आहे
. किंबहुना त्यावाचून गत्यंतर नाही, असेच म्हणावे लागेल. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी फक्‍त पुरुषाची राहिली नाही आणि घरातील कौटुंबिक जबाबदारी फक्‍त बायकांची राहिलेली नाही. एकमेकांना पूरक असे काम करून दोघांनाही सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यामुळेच आता पूर्वीपेक्षा पती-पत्नीतील वादविवादाचे विषयही बदलत चालले आहेत. दोघांनाही एकत्र राहात असतानाच स्वत:चे स्वतंत्र अस्तित्वही जपायचे आहे आणि याला जोडीदाराकडून विरोध झाला की वाद होतोच. व्यक्‍तिगत स्वातंत्र्याबाबत जागरूक होताना कोणी कोणाचं ऐकायचं, हा प्रश्‍न निर्माण होतो. अशा वेळेसच स्वत:मधील शक्‍ती ओळखता आली पाहिजे आणि जोडीदाराच्या चांगल्या गुणांचं कौतुक करण्याची दिलदारी दाखवता आली पाहिजे. स्वत:चे चुकले, तर कबूल करण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवता आला पाहिजे. 
लग्न बंधन टिकवण्यासाठी
परस्परांवरचा विश्‍वास
, प्रेम आणि एकनिष्ठता असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समंजसपणे स्वीकार करून स्वत:लाही आनंद मिळवण्यासाठी जोडीदाराला आनंद देण्याची तयारी ठेवली, तर वैचारिक मतभिन्नता असूनही लग्न टिकतात; परंतु सुखाच्या क्षणांची शक्‍यता अगदीच शून्य असेल, दोघांच्या नात्यात सतत शिवीगाळ, चिखलफेक होत असेल, तर दोघांच्या व्यक्‍तिगत आयुष्यातील आनंदच संपून जातो. एकमेकांना ओरबाडत बोचकारत ओढून ताणून टिकवलेलं लग्न अधिक त्रासदायक असत म्हणून नात टिकवायचं की संपवायचं हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला लागतो. नातं टिकवायचं असेल, तर त्यात अधिकाधिक आनंद निर्माण होईल, असे बदल करणे अनिवार्य आहे. अन्यथा, शांतपणे अशा नात्यांना पूर्णविराम देणं योग्य ठरतं. 

लक्षात घ्या 
1)
लग्नाच्या नात्यात एकमेकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार जागरूकपणे करणे गरजेचे आहे आणि त्याचा मनापासून स्वीकार करणे आवश्‍यक आहे. 

2)
नाती टिकवण्यासाठी जुने हट्ट आणि सवयी सोडून देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि नवीन कौशल्य आणि आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. 
3)
पती-पत्नीच्या वादविवादाचे खरे कारण शोधून काढले, तरच त्यावरील उपाय निश्‍चितपणे सापडतो. 
4)
समाजाला दाखवण्यासाठी नातं टिकवण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी नातं टिकवण्याला प्राधान्य द्या. 
5)
जी नाती मोडकळीस आलेली आहेत आणि टिकणं शक्‍य नाहीत, अशी नाती जबरदस्तीने जपू नका. समंजसपणे अलग होण्याची मानसिक तयारी ठेवा. मनातल्या मनात कुढत बसू नका. 

स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक